...तर चांगलं तीन वर्षे धान्य चारून गुबगुबीत फुगलेला तुरेबाज कोंबडा
म्हसोबाला कापल्यावर नाना मला म्हणाला, "चांगलं दोन शेर मटण पडलंय बघ!"
असलं आमंत्रण मिळाल्यावर आपुन दुपारपासून लई खुशीत होतो. उगीच इकडून
तिकडून फिरत होतो. मला असं फिरताना बघून रस्त्यानं निघालेली हिरा नानी
गडबडीनं माझ्याकडं आली अन "कवा आलास?" या तिच्या प्रश्नाचं उत्तर दयायच्या
आधीच पुढं म्हणाली, "आरं किलुभर गरा अन तांदूळ आणून शिराभात केलाय!
म्हाताऱ्याची आज पुण्यतिथी हाय! गरीबाच्यात कोण येतंय जेवायला! तू तरी ये
सांच्याला, म्हातारा तुझं सारखं नाव काढायचा?"...
नमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे? खरच त्याचं जगणं बदललं का? की तो आहे तेथेच आहे? या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...!!!
Monday, May 29, 2017
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment