ऐन
थंडीचे दिवस असायचे. धुक्यानं पांदीतली झाडं झुडपं, कौलारु घरं आणि
नागमोडी वळणाच्या रस्त्यानी दवबिंदूची पांढरी झालर पांघरलेली असायची.
घराघरातली चुलवानं पेटून त्यातून उठलेले धुराचे लोळ कौलारु पाक्यातनं उसळत
बाहेरच्या धुक्यात मिसळून जायचे. हिरव्यागार झालेल्या शिवारातल्या पिकावर
पडलेले दव खाली सांडायला सुरवात झालेली असायची. अशा पौषातल्या जीव खाणाऱ्या
थंडीत लव्हाराचा शिवा भल्या सकाळी माणूस गोठवणाऱ्या नदीत अंघोळ करायला
उतरायचा. अंघोळ करुन पिळलेली चड्डी डोक्यावर टाकून खांद्यावर पाण्याची
पितळेची कळशी घेवून नदीची डगरट चढून घराकडं येताना दिसायचा.
पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....
पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....
No comments:
Post a Comment