Friday, December 15, 2017

किसानानी

"आज जायाचा म्हणतुयास तर तेवढं वस्तीवरच्या किसानानीला भेटून ये! तू गावाला आल्यावर घरी पाठवून दे म्हणालीय! थकलीया आता बिचारी!" आईने असे सांगितल्या सांगितल्या मी पायात चप्पला घातल्या अन नानीच्या वस्तीची वाट चालू लागलो. वाट चालता चालता तरुणपणापासून  म्हातारपणापर्यंत जगलेली आख्खी किसानानी डोळ्यापुढे दिसू लागली. मला खुणावू लागली. तिच्यावर आता वाईट दिवस आलेत असं आईनं निघताना सांगितल्यामुळे तर मी अधिकच अस्वस्थ झालो. चालता चालता दोन ठिकाणी ठेचकाळलो. कित्येकवेळा मी लहान असताना आई मला या किसानानीकडे अंडी आणायला पाठवायची. गावात कुठे नाही पण या नानीकडे अंडी नक्की सापडायची.
नानीच्या दारात नेहमी चार म्हशी, दोन रेडकं, एक शेरडी, चांगल्या पन्नासभर कोंबड्या दिसायच्या. या नानीला सहा पोरी. अन सहा पोरींच्या पाठीवर नवसाने जन्माला लेला मारुती. आणि या मारुतीच्या जन्मानंतर काळाने उचललेला नवरा. एवढीच काय ती इस्टेट अंगावर घेऊन टेचात जगणारी किसा नानी मी लहानपणापासून पहात आलेलो. आता तुम्ही म्हणाल, “पदराला सात पोरं घेऊन बाई कशी जगली असल.तर किसा नानी जगली. अन पोरं सुद्धा जगवली. नुसत्या पोरीच पोटाला आल्यावर घराला दिवटा पाहिजेल. या नवऱ्याच्या हट्टापायी किसा नानीनं काय काय केलं सल.

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....

#ज्ञानदेवपोळ 

फोटो सौजन्य: shutterstock.com




No comments:

Post a Comment