दोन पोरींची लग्नं पार पाडल्यावर परवा
तिसऱ्या पोरीचं लग्न ठरल्यावर
रातभर डोळं उघडं ठेवून झोपलेला नवरा बघून, सकाळी
मंगलाबाईनं जुन्या लाकडी
पेटीतून कापडात बांधलेला पितळेचा डबा काढला. अन सोफ्यात भिताडाला टेकून बसलेल्या मेलेल्या नवऱ्याला जिवंत करत ती एवढच
म्हणाली, "आयनं केलेल्या या तीन तोळ्याच्या
पाटल्या हायत्या! उठा अन पेठत जाऊन मोडा..."
नमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे? खरच त्याचं जगणं बदललं का? की तो आहे तेथेच आहे? या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...!!!
Saturday, April 15, 2017
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment