पश्चिमेकडे सूर्याचा गोळा डोंगराआड झाला तशी शेतातली कामं आवरून
बाया माणसं घराकड परतु लागली. आकाशातून पाखरांचे उंच थवे धावू लागले.
डोंगराकडच्या बाजुने गुराखी गुरं घेऊन घराकडे उतरु लागले. वैरणीचा भारा
घेवून खालीमानेनं एखांदा वयस्क घराची वाट कमी करू लागला. पांदीतून
बैलगाडयांचा आवाज होऊ लागला. बैलांच्या गळ्यातले चाळ खणखणू लागले. अंधार
चढू लागला तसा पांदीतल्या बैलगाडयांचा आवाज थांबला. दिवेलागण झाली.
कुलकर्ण्याचा ट्रॅक्टर दारावरून गेला. घराघरातल्या चुली पेटू लागल्या.
दूरच्या रस्त्याने कुठूनतरी एखांदे वाहन उजेड पडत जाऊ लागले.
नमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे? खरच त्याचं जगणं बदललं का? की तो आहे तेथेच आहे? या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...!!!
Thursday, December 15, 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment