गावापासून हायस्कूलच्या शाळेत रोज मी चार किलोमीटर कच्या रस्त्यानं अणवाणी
पायानं चिखल तुडवत, नाहीतर फुफाटा उडवत चालत जायचो. ओढ़ा ओलांडून पुढं गेलं
की सारा हिरवागार माळ लागायचा. या माळावर नेहमी खाली मुंड्या घालून गुरं
ढोरं चरताना दिसायची. त्यांच्या पाठीवर बगळे नाहीतर कावळे डुलत बसलेले
हमखास दिसायचे. रस्त्यावर माणसांची अशी वर्दळ आजीबात नाहीच. अश्या या
हिरव्यागार माळाकडं बघत एका हातात कापड़ी पिशवीत दप्तर घेवून एखांदा विचार
डोक्यात घेवून मी शाळेची वाट चालू लागायचो. तिथच माळावर रस्त्याच्या कडेला
आठ दहा घरांची एक वस्ती लागायची. वस्तीच्या भोवती झाडांची बरीच गर्दी होती.
तेथून जाताना बरं वाटायचं. कधी कधी त्या झाडांच्या सावलीत बसल्यावर पुढे
जावूच वाटायचं नाही. रस्त्याशेजारी तिथल्याच एका खणभर घरात गाडग्या
मडक्यांचा संसार करीत साठी ओलांडुन गेलेली एक बाई एकटीच राहयची. काशीबाई
तिचं नाव.
पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....
पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....
No comments:
Post a Comment